अपघातग्रस्त व्यक्तीचे मनोगत - Apghatgrasth Vykatiche Manogat.
मित्रमैत्रिणींनो, आज आपण अपघातग्रस्त व्यक्तीचे मनोगत किंवा अपघातग्रस्त व्यक्तीचे आत्मवृत्त बघणार आहोत.
अपघातग्रस्त व्यक्तीचे मनोगत.
दैनंदिन जीवनात प्रवास करताना आपण बरेसचे अपघात बघतो. त्यावेळी आपल्याला क्षणभरासाठी खूप हळहळ ही वाटते परंतु काही वेळाने आपण आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन ते विसरून जातो. पण कधी विचार केला आहे का कीं त्या अपघातात ज्या व्यक्तीला दुखापत झाली असेल त्याच्या मनात काय भावना असतील? असेच एक काका आमच्या बाजूला राहतात ते त्यांचे मनोगत आज आपल्याला सांगत आहेत.
नमस्कार मित्रांनो, मी सखाराम बोलतोय. मी एक अपघातग्रस्त व्यक्ती आहे. होय! माझा अपघात झालंय आणि त्यात माझा एक पाय दुखावला गेला आहे. आज मी तुम्हाला माझा अपघात कसा आणि का झाला हे सांगू इच्छितो. जेणेकरून माझ्या आयुष्यात माझे जे नुकसान झाले आहे तसें नुकसान तुमचे होऊ नये.
मी माझ्या कुटुंबामध्ये एकच माणूस जो कमावता आहे. माझ्यावर माझ्या सर्व कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. माझी नोकरी तशी बेताचीच परंतु त्यात माझ्या कुटुंबाचे पालनपोषण व्यवस्थित चालत होते म्हणून मी समाधानी आहे. नोकरीचे ठिकाण घरापासून काहीसे लांब असल्यामुळे मला रेल्वेने प्रवास करावा लागयचा. ऑफिसची वेळ सकाळी ऐन गर्दीच्या वेळीच होती म्हणून रोज गर्दीत चढूनच जावे लागायचे. पण आता इतकी वर्षे या गर्दीची सवय झाली होती म्हणून तितकासा काही फरक पडत नसे.
मागील महिन्यात असेच एके दिवशी मी नेहमीसारखा ऑफिस मध्ये जाण्यासाठी निघालो होतो पण त्या दिवशी मला जरा लवकर कामावर जायचे होते म्हणून मला माझी रोजची ट्रेन सोडून आधीच्या वेळेच्या ट्रेनने जावे लागणार होते. आधीच्या ट्रेन मध्ये तर अजूनच गर्दी मी पाहिलेली होती परंतु जशी ट्रेन फलाटावर आली तसेच सगळी लोक त्यात चढण्यासाठी गर्दी करू लागले. इतक्यात ट्रेन सुटणार असा आवाज येताच मी ही जो खांब दिसेल त्याला घट्ट पकडून ट्रेन मध्ये चढण्यासाठी सज्ज झालो होतो आणि क्षणार्धात ट्रेन सुरु झाली.
मी ट्रेन च्या एका कोपऱ्याच्या दांडीला दोरात पकडून ठेवले होते परंतु गर्दी एवढी जास्त होती कीं हात दांडीवरून सुटेल कीं काय ही भीती सतत मला वाटते होती. ट्रेन सुरु होऊन काही अंतर पुढे गेली आणि माझ्या मनात सारखे वाटते होते कीं उगाच घाई करून ही ट्रेन पकडली कारण माझा हात सारखा सुटण्याची मला भीती वाटते होती परंतु आता हळू हळू ट्रेनने जलद गती घेतली आणि मला आता ट्रेनच्या त्या खांबाला घट्ट पकडून ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता.
माझी मनस्थिती खूपच भयावह झाली होती कारण ट्रेनमधून आतील भागातील लोकांचे धक्के हे मला आणि माझ्यासारख्या बाहेर उभे राहणाऱ्या बऱ्याच लोकांना बाहेरच्या बाजूला ढकलले जात होते. मनगटामधील ताकतपण आता हळू हळू साथ सोडू लागत होती. कधी एकदा पुढील स्टेशन येतो असे मला झाले होते. अंगात घाम फुटला होता, शरीरातील ताकत संपली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच मनातील भीती वाढली होती त्यामुळे शरीर साथ देत नव्हते. तेवढ्यात लांबून मला स्टेशन नजरेस पडले आणि थोडा माझ्या जीवात जीव झाला परंतु तेवढ्यातच आतील लोकांमधून एक जोरात धक्का आला आणि काही कळण्याच्या आताच माझा हात ट्रेनच्या खंबापासून निसटला आणि मी खाली पडलो.
माझा अपघात झाला होता! एका क्षणात सगळं बदलल होत. त्यानंतरचे मला काहींच आठवत नाही परंतु मग जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका दवाखान्यात भरती झालेला होतो. माझ्या एका पायाला गंभीर दुखापत झाली होती हे मला लक्षात आले. माझे कुटुंबीय शेजारीच उभे असलेले मला दिसलें. त्यांना दुःखी बघून मला खूप वाईट वाटत होते परंतु आता वेळ निघून गेली होती.
आज एक महिना झाला आहे मी ऑफिस मध्ये जाऊ शकलो नाही. कदाचित मी पूर्वीसारखा नीट ऑफिस मध्ये जाण्यासाठी अजून काही कालावधी लागेल परंतु माझ्या मनामध्ये माझ्याबरोबर झालेल्या अपघाताची जी भीती निर्माण झाली आहे त्या मधून मी कसा काय बाहेर येणार? माझा पाय पूर्णपणे ठीक होईल काय? मला पुन्हा ऑफिसमध्ये पूर्ववत रुजू करतील कीं नाही? आणि जर मला कामावर घेण्यास नकार दिला तर माझे आणि माझ्या कुटुंबाचे पोट मी कसे भरेल या सगळ्यांची चिंता मला सारखी सतावत असते.
माझ्या हया अनुभवावरून मला तुम्हाला सर्वाना एकच कळकळीची विनंती करायची आहे कीं किती ही झाले तरी प्रवासात कोणत्याही प्रकारची घाई गर्दी करू नका. आपली काळजी घेत असताना इतरांचीही काळजी प्रवासात घेतली पाहिजे. कारण आपल्यावरच आपल्या घरचेही अवलंबून असतात. तेव्हा जपून प्रवास करा जेणेकरून कधीही आपला अपघात होणार नाही आणि आपल्यामुळे इतर कोणाचाही अपघात होणार नाही. स्वतःला ही सांभाळा आणि इतरांनाही सांभाळा.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.