Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी कथालेखन - प्रामाणिकपणाचे फळ - Marathi Kathalekhan - Pramanikpanache Fal - Story Writing In Marathi.

मराठी कथालेखन | प्रामाणिकपणाचे  फळ | Marathi Kathalekhan | Pramanikpanache Fal | Story Writing In Marathi |



         
मराठी कथालेखन - प्रामाणिकपणाचे  फळ - Marathi Kathalekhan - Pramanikpanache Fal - Story Writing In Marathi.
 प्रामाणिकपणाचे  फळ 




एक गरीब मुलगा ---पैसे नाहीत ---शाळेचा खर्च करणे अशक्य ---सकाळी पेपर टाकण्याचे काम ---वाटेत पैशाचे पाकीट मिळते --- प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनवर नेऊन देतो ---पाकिटाच्या मालकास आनंद ---बक्षी​स


शिर्षक - प्रामाणिकपणाचे फळ.


रामपूर नावाच्या एका गावात सागर नावाचा एका मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. त्याची आई लोकांच्या शेतावर मोलमजुरीची कामे करत असे परंतु त्या कामातून सागर आणि त्याच्या आईचा उदरनिर्वाह नीट होत नसे. 

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे सागरला शाळेची फी भरण्यासाठी ही पैसे नव्हते परंतु त्याला शिक्षणाची आवड होती व आपले शिक्षण अर्धवट राहू नये अशी त्याची मनापासून इच्छा होती. घरच्या आर्थिक परिस्थिती समजून घेतल्याने त्याला शाळेचा खर्च अशक्य वाटू लागल्यामुळे त्याने आपल्या आईला आर्थिक हातभार लावण्याचे ठरविले.

सागर हा हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. घरच्या आर्थिक परिस्थितीची त्याला पूर्ण कल्पना होती व शाळा ही अर्धवट सोडायची नव्हती म्हणून तो शाळेच्या वेळेच्या आधी सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम करू लागला. या कामामुळे मिळालेल्या पगारातून त्याला शाळेची फी भरण्यासाठी थोडी मदत होऊ लागली.

एके दिवशी सागर असाच त्याचे पेपर वाटण्याचे काम करीत असतानाच वाटेत त्याला एक पैशाचे पाकीट पडलेले दिसले. ते पैशाचे पाकीट उचल्यावर ते खूप भरलेले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी तो एका क्षणाचाही विलंब न करता काही अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये जावून त्याने ते पैशाने भरलेले पाकीट तेथील पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी ते पाकीट तपासल्यावर त्यामध्ये त्याच्या मालकाचे ओळखपत्र सापडले व त्याला पोलिसांनी बोलावून घेतले आणि त्याचे पाकीट त्याच्या स्वाधीन केले.

आपले हरवलेले पाकीट पुन्हा सापडलेले बघून तो मनुष्य फारच आनंदी झाला. पोलिसांनी त्याला त्याचे हरवलेले पाकीट सागरने कसे परत मिळवून दिले याची संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्या माणसाने सागरच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक करून त्याचे आभारही मानले व त्याचबरोबर त्याने सागरला बक्षीस ही दिले.

सागरला मिळालेले हे बक्षीस म्हणजेच त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ होते. सागरने केलेली ही कामगिरी ऐकल्यावर त्याची आई आणि शाळेतील शिक्षक ही खूप आनंदी झाले.



तात्पर्य -


( टीप - विदयार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close