Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त - Dahavichya Vidyarthyache Aatmvrutta- Autobiography Of 10th Standard Student Essay In Marathi.

दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त | Dahavichya Vidyarthyache Aatmvrutta | Autobiography Of 10th Standard Student Essay In Marathi |




            
दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त - Dahavichya Vidyarthyache Aatmvrutta- Autobiography Of 10th Standard Student Essay In Marathi.
दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त - Dahavichya Vidyarthyache Aatmvrutta- Autobiography Of 10th Standard Student Essay In Marathi.





मित्रमैत्रिणींनो आज आपण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्मवृत्त या विषयावर निबंध बघणार आहोत.


नमस्कार मित्रांनो, माझे नाव सागर आणि यंदा मी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. आज मी तुमच्यासमोर माझे मनोगत सांगणार आहे. नक्की ऐका. मी सागर साने. मी मुंबईतील राहणारा मुलगा. माझा जन्म इथेच मुंबईला झाला. मी माझे आई-वडिल व मोठ्या ताई बरोबर इथे राहतो.

माझे बालपण तसे ठीक ठाकच गेले आहे. लहानपणापासूनच मी फार मस्तीखोर व चपळ. वर्षभर होणाऱ्या निरनिराळ्या सणा-वारात मी मनापासून सहभागी होणारा मुलगा. शाळेत ही अगदीच हुशार नाही वा अगदी ढ ही नाही असा मध्यम काठावर पास होणारा मी यंदा दहावीला आलो आहे.

जसे नववीचा निकाल लागला आणि मी इयत्ता दहावीला आलो आहे तसे जणू काही माझे संपूर्ण आयुष्याच बदलून गेले आहे. पहिल्या इयत्तापासून नावव्या इयत्तेपर्यंत माझ्या शाळेच्या अंतिम निकाल लागल्यानंतरची जी प्रक्रिया होती ती अचानक दहावीला आल्यानंतर बदलूनच गेली.

पहिल्यांदा वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर एकदा का पुढील वर्षात प्रवेश मिळाला की आम्ही सर्व मित्र - मैत्रिणी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आंनद घेण्यासाठी अगदी मोकळे होऊन जायचो.

उन्हाळा म्हणजेच माझा आवडता ऋतू कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या मोठ्या आणि जवळपास दोन महिने असतात मग काय मामाच्या गावी जाणे असो किंवा माझ्या गावी जाणे असो मज्जाच मज्जा असते. माझे गाव मला खूप आवडते. तेथे गेल्यावर तर दिवसभर हिंडा - फिरा, हवे तेवढे भटकंती करा परंतु कोणीही काही ही बोलत नाही आणि आता जसे नववीतून दहावीत प्रवेश केला तसे लगेचच खांद्यावर कोणी तरी भली मोठी जबाबदारी टाकल्याची जाणीव होऊ लागली आहे.

निकाल लागताच शाळेच्या सूचना फलकावर नोटीस लावण्यात आली की दहावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या नसून फक्त पुढील आठवड्यापासून लगेचच आमचे ज्यादा वर्ग भरविण्यात येणार होते. झाले तर मग! या वर्षीच्या सुट्ट्या काहीच नाही हे ऐकून आम्हा सर्वांची घोर निराशा झाली.

निकाल घेऊन घरी पोहचलो तर लगेचच घरच्यांनी ही चार सल्याच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली जसे की, या वर्षी दहावीचे वर्ष आहे. नीट लक्ष देऊन अभ्यास कर. आता पुरे झाले क्रिडांगणावर सारखे क्रिकेट आणि फुटबॉल खेळणे.

या वर्षी गावी जाण्याचे बेत ही रद्द झाले. आता मनसोक्त आंबा खाण्यासाठी मस्त गावी जाऊ हे मी पाहिलेले स्वप्न ही जवळपास धुळीला मिळाले होते. या वर्षी तर माझ्या मामे भावाचे लग्न ही आहे तेथेही जाणे होते की नाही याची आतापासूनच मला शंका वाटत होती.

जरा काही मज्जा करायचे बोललो किंवा जरा कुठे फिरून येऊया बोललो तर यंदा तू दहावीला आहेस. दहावीचे वर्ष आपल्या आयुष्याचा पाया घडविणारे फारच महत्वाचे वर्ष असते अशी अनेक वाक्ये घरच्याबरोबरच इतर नातेवाईक वा ओळखीच्या लोकांकडून ऐकायला मिळायला लागली आहेत.

जेव्हा पासून मी दहावीच्या वर्षाला आलो आहे तेव्हापासून एवढे काय बदलले आहे माझ्या आयुष्यात एका रात्रीत तेच मला कळेनासे होत आहे आता. खरंच का हे इयत्ता दहावीचे वर्ष इतके महत्वाचे असते का प्रत्येकाच्या आयुष्यात?

माझी आई तर मला प्रत्येक वेळी माझ्या ताईचे उदाहरण देत राहते कारण माझी ताई आमच्या शाळेतून दुसरी आली होती. माझी तर तर पहिलापासूनच हुशार वा अभ्यासू. घरात ही आणि शाळेत शिक्षकांची ही ती लाडकी परंतु मला नेहमी तिच्यावरून सगळीकडेच ऐकून घ्यावे लागत होते.

निकालाच्या दुसऱ्याच दिवशी माझे एका चांगल्या शिकवणी मध्ये ऍडमिशन झाले. त्या शिकवणीच्या बाहेरच एका पोस्टर वर गेल्या वर्षी त्यांच्या कलाससेस मधून किती विद्यार्थी बोर्डच्या म्हणजेच दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले होते त्यांचे फोटो लावले होते.

मला खूपच भीती वाटत होती की इतकी वर्षे अभ्यास जेवढा जमेल आणि जसा जमेल तसा मी स्वतः च करत होतो परंतु आता शाळेबरोबरच हे एक नवीन क्लास वर्षभर माझ्या दिनचर्येचा एक भाग बनून राहणार होता. मी आता दहावी बोर्डाचा मुलगा झालो होतो.

दहावीच्या बोर्डाच्या या वर्षाच्या माझ्या दैनंदिन दिनचर्येची सुरुवात आता खऱ्या अर्थाने सुरु झाली होतो. पूर्वी सकाळी आठ वाजता उठणारा मी आता सकाळी सहा वाजता उठू लागलो. अर्धवट झोपेतून सगळे आवरून बरोबर सात वाजता मी माझ्या कलाससेस मध्ये हजर राहू लागलो. सात ते अकरा मी शिकवणी करून घरी येऊन पुन्हा शाळेला जाण्यासाठी तयारी करून दुपारी बारा ते संद्याकाळी सहा पर्यंत शाळा करू लागलो.

प्रत्येक आठवड्याला एका विषयाची सराव परीक्षा होते त्याची ही तयारी करावी लागते. वेळेवर झोपून वेळेतच उठावे यासाठी आई आवर्जून लक्ष देऊ लागली. पूर्वी लगेच मागून मिळणारे जंक फूड आता काही काळासाठी आमच्या घरात येणे बंद झाले आहे कारण ऐन परीक्षेच्या वेळी माझ्या तब्येतीच्या बाबतीत आता कोणाला ही रिस्क घ्यायची नव्हती.

आई बाबा आणि ताई कटाक्षाने माझ्यावर नजर ठेऊन असतात जसे की मी आमच्या घरचा एक महत्वाचा केंद्राबिंदूच झालो आहे. ना दिवाळी मनापासून साजरी करायला मिळाली ना होळी.

प्रत्येक वेळी दहावीचे वर्ष असल्याचे कानावर येत राहिले. शाळेतील वातावरण तर विचारूच नये. इतर विदयार्थ्यांना बघून वाटत राहते की ते सतत काही ना काही तरी वाचत असतात, नवनवीन गणिते सोडविण्याचा, शिक्षकांना सतत शंका विचारण्यासाठी तत्पर असतात. ही असली कसली जीवघेणी स्पर्धा की ज्यामुळे दहावीला गेलो की आपण मनसोक्त आयुष्य अनुभवू शकत नाही हे मला समजत नाही.

पुढील महिन्यात दहावीची बोर्डाची अखेरची परीक्षा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्यात जास्तीत जास्त भरघोस यश मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो आहे तसे मी ही माझ्या परीने जेवढे होऊ शकेल तेवढी मेहनत घेत आहे आणि मला आत्मविश्वास आहे की मी माझ्या परीक्षेसाठी चांगलाच सराव ही केलेला आहे आणि अजूनही करणार आहे.

परंतु माझी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना आज एकच विनंती आहे की, मान्य आहे तुमच्या आम्हा मुलांकडून खूप अपेक्षा आहेत व आमचे भविष्यात चांगले व्हावे म्हणूनच तुम्ही ही झटत आहात परंतु माझी तुम्हा सर्व पालक वा शिक्षकांना ही छोटीशी विनंती आहे की कृपया आम्हा विद्यार्थांना आमच्या बुद्धीक्षमतेनुसार अभ्यास करू दया आणि तो आम्ही नक्कीच चांगलाच करू परंतु आमच्या निकालाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबर मुळीच करू नका.

दहावीचे वर्ष म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यावर अपेक्षाचे नाहक ओझे टाकून त्यांना कोणत्याही दबावाखाली आणू नका त्या उलट दहावीच्या विद्यार्थांला आत्मविश्वास वाढविण्यासाठी सकारात्मक पाठिंबा दया आणि बघा मग दहावीच्या बोर्डाच्या निकाल नक्कीच चांगला लागेल.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close