माझा महाविद्यायालयात पहिला दिवस। My First Day At College Essay In Marathi।
![]() |
माझा महाविद्यायालयात पहिला दिवस- My First Day At College Essay In Marathi. |
मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा महाविद्यालयात पहिला दिवस या विषयावर वर्णनात्मक निबंध बघणार आहोत.
काही दिवसापूर्वीच माझा दहावीचा निकाल लागला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला व माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना माझ्या दहावीच्या निकालात भरघोस यश प्राप्त झाले. त्यामु माझे पुढील काही दिवस कौतुक सोहळ्यात व ठिकठिकाणी बक्षीस समारंभातच गेले.
आजूबाजूचे अनेक लोक, जवळचे काही नातेवाईक येऊन मला चांगल्या चांगल्या भेटवस्तूही देऊन गेले. आता तयारी सुरू झाली ती माझ्या महाविद्यालयीन प्रवेशाची. आई, बाबा, मोठी ताई सारे मिळून मला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबद्दल आपापले मत सांगू लागले. परंतु मला मात्र माझ्या इतर मित्र-मैत्रिणींबरोबर एकाच महाविद्यालयात जायचे होते.
बालपणापासून ते आता दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकल्यामुळे मला आता माझी शाळा जास्त जवळची वाट लागली होती परंतु आता शाळा सोडून इतक्या वर्षाचे जुने मित्र मैत्रिणी सोडून अचानक एका अनोळखी महाविद्यालयात जायचे याबद्दल मनावर एक दडपणही होते.
महाविद्यालयीन जीवन म्हणजे सारेच काही आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असे फक्त ऐकून ठेवले होते. म्हणून तिथे जाण्यासाठी एक हुरहुर ही लागली होती परंतु एका अनोळखी ठिकाणी आता यापुढील शिक्षण घ्यायचे याची एक भीतीही वाटत होती.
ज्या महाविद्यालयात मला प्रवेश मिळेल त्याच महाविद्यालयात माझ्या इतरही मित्र-मैत्रिणींना प्रवेश मिळेल की नाही की तिथे फक्त एकटाच जाईल या विचारांचे काहूर माझ्या मनात सतत दाटले होते. शेवटी कुटुंबातील सर्वांच्या विचाराने मी दोन-तीन निरनिराळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज टाकले.
चार आठ दिवसांनी साठी टाकलेल्या अर्जांची लिस्ट त्या त्या महाविद्यालयात लागणार होती. परंतु तोपर्यंत काही माझ्या जीवात जीव येत नव्हता. कसे असेल ते महाविद्यालय? किती मोठे असेल? निरनिराळ्या ठिकाणाहून किती वेगवेगळ्या प्रकारची मुले तिथे आले असतील? त्यातील माझं कोणी मित्र बनेल का? की तिथे गेल्यावर मला एकटेपणा जाणवेल? माझ्या शाळेतील किती मुलांना तिथे प्रवेश मिळेल? की माझे प्रत्येक मित्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेऊन आमच्या सर्वांची ताटातूट ठेवून जाईल असे अनेक विचार मनात घोंगावत होते.
शेवटी प्रवेशाच्या याद्या लागल्या आणि ज्याची भीती होती तेच झाले. मला आणि माझ्या इतर दोन मित्रांना निरनिराळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. ही बातमी ऐकताच माझे मन फारच खट्टू झाले. परंतु आईने समजावले की महाविद्यालयात गेल्यावर अजूनही तुला नवीन मित्र मिळतील व निरनिराळ्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यामुळे तुझे जुने मित्र काही तुझ्यापासून तुटणार नाहीत तर त्यांच्याशीही तुझी मैत्री कायम राहील असा तू प्रयत्न कर.
आईच्या या बोलण्याने माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता. शेवटी ज्या दिवसाची आपण सारे जण वाट बघत असतो तो दिवस माझ्या आयुष्यातही आला. तो म्हणजे माझा महाविद्यालयाचा पहिला दिवस.
आज पर्यंत सकाळी लवकर उठून शाळेत जायचे तिकडे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा, आपापल्या मित्र-मैत्रिणींना भेटायचे, तेच वर्ग, तिच हवीहवीशी वाटणारी माझी शाळा, तेच आपुलकीने वागवणारे निरनिराळ्या विषयांचे शिक्षक जे लहानपणीपासूनच आपल्या ओळखीचे होते यांच्या सहवासात नेहमीच असल्यामुळे शाळेत जाताना कधीच कोणते दडपण आले नव्हते परंतु आज महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयात जाताना माझ्या मनावर अगदी तसेच काहीसे दडपण आले होते जसे शाळेचा पाहिला दिवस होता तेव्हा आले होते.
सकाळी सात वाजता महाविद्यालयात पहिली तासिका होती. महाविद्यालयाच्या गेटवर प्रवेश करतात मला भली मोठी इमारत समोर दिसली. गेटच्या आत जातात अनेक ठिकाणी निरनिराळी मुला-मुलींचे आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर ग्रुप उभे असलेले मला दिसत होते.
जसं जसं मी महाविद्यालयाच्या आत जात होतो तसतसे माझ्या मनात धडकी भरत होती. मला इथे कोणीच ओळखत नाही आणि माझा इथे कोणीही मित्र नाही त्यामुळे या साऱ्यांच्या घोळक्यात माझा कसा काय टिकाव लागेल असे मला वाटत होते. मग मी मन घट्ट करून आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतला व त्याचबरोबर एखाद दुसरी तासिका थांबून त्यानंतर घरी लवकर निघून जाईन असा विचार केला.
गेटच्या प्रवेश करतास पुढे जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानुसार त्याच्या वर्गाची यादी एका भिंतीला चिटकवलेली होती त्यानुसार माझ्या नावापुढे कोणत्या मजल्यावर माझा वर्ग आहे त्याचा नंबर लिहिला गेला होता. आता मी त्यानुसार माझ्या वर्गाच्या दिशेने निघालो.
जस जसा मी माझ्या वर्गाच्या दिशेने निघत होतो तसतसं मला माझ्या शाळेची इमारत आठवत होती. माझ्या शाळेत आणि या माझ्या नवीन महाविद्यालयात मला खूप फरक जाणवत होता. माझा वर्ग दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे हळूहळू मी दुसऱ्या मजल्याच्या दिशेने जात होतो आणि त्याचबरोबर महाविद्यालयाचे नीट निरीक्षणही करत होतो.
एकदाचा माझा वर्ग माझ्या नजरेत आला आणि मी माझ्या वर्गात प्रवेश करत असताना मला दरदरून घाम फुटला होता व माझे हातपाय थंड पडले होते. खरंतर घाबरण्याचे काहीच कारण नव्हते परंतु तरीही मला अनामिक भीती वाटत होती.
वर्गात प्रवेश करताच मी एका रिकाम्या बाकावर जाऊन बसलो आणि फळ्याकडे एकटक बघत होतो बसलो. एकेक करून विविध मुलं-मुली त्या वर्गात प्रवेश करत होते. कोणी एकमेकांचे पहिल्यापासूनच मित्र-मैत्रिणी होते तर कोणी माझ्यासारखेच अनोळखी आणि एकटे एकटे येऊन बसत होते. मी फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांचे शांतपणे निरीक्षण करत होतो.
एवढ्यात काही वेळातच मला एक आवाज ऐकू आला. तुझ्या शेजारी जर कोणी बसत नसेल तर मी बसू शकतो का? असे कोणीतरी मला विचारत आहे हे मी बघितले. पाहिले तर शेजारीच एक मुलगा माझ्याशी बोलत होता. प्रथमदर्शी पाहताच अत्यंत साधा सरळ आणि माझ्याचसारखा थोडा घाबरलेला असा तो मुलगा माझ्या शेजारी बसण्यासाठी मला विचारत होता. हो !हो! नक्कीच बसू शकतोस, असे मी त्याला उत्तर दिले. तो माझ्या शेजारी बसला आणि काही वेळातच आम्हा दोघांची चांगलीच गट्टी जमली.
तो गावावरून त्याच्या मामाकडे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आला होता. स्वभावाने फार शांत सरळ पण अभ्यासात एकदम हुशार होता. आता मात्र मला त्याच्याशी बोलून थोडे बरेही वाटले होते आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता. हळूहळू एकेक तासिका कशी उलटून गेली आम्हाला लक्षातच आले नाही. आणि काही वेळाने आमची महाविद्यालयाची आजच्या दिवसाची वेळ संपलेली आहे आणि शेवटची तासिका सुरू आहे असे लक्षात आले होते.
आजचा दिवस संपला होता व जाता जाता आम्ही दोघांनी एकमेकांकडे खूप गप्पा मारल्या. आम्ही चांगले मित्र बनलो होतो. घरी जाता जाता आम्ही त्या महाविद्यालयाची कॅन्टीन, लायब्ररी, क्रीडांगण व कला आणि नृत्य अकादमी या साऱ्या गोष्टी चांगल्या प्रकारे बघून घेतल्या. आता आम्ही दोघे मिळून महाविद्यालयाचा कानाकोपरा फिरून आलो होतो व बोलता बोलता अजूनही दोन-चार मित्र बनवून झालो होतो.
घरी जाण्याची वेळ जवळ आली होती व महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसाची जेवढी भीती मला वाटत होती ती मात्र आता कमी झाली होती. हे भव्य महाविद्यालय आता माझ्या पुढील भविष्याचा पाया ठरणार होते. येथे विविध विषयांचा अभ्यास करून मी माझ्या भविष्याची वाटचाल सुरळीतपणे करणार होतो परंतु त्यासाठी चांगल्या मित्रांच्या साथी ची व चांगल्या शिक्षकांची व चांगल्या गरज होती आणि ते सर्व येथे नक्कीच मिळेल याची मला आता खात्री वाटत होती.
मला स्वतःबद्दल एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. आता मला मात्र कधी घरी जाऊन आई बाबा आणि ताईला माझ्या या महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगतो असे झाले होते त्याचबरोबर कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि मी पुन्हा माझ्या महाविद्यालयात येतोय अशी ही मला हुरहुर लागली होती.
खरंच शाळा आणि शाळेचे दिवस आपल्या आयुष्यात एक गोड अशी आठवण ठेवून जातात आज ही शाळेचा निरोप घेताना जी भावना मनात आली होती तिची आठवण आली की मन भरून येते परंतु महाविद्यालय व महाविद्यालयाने दिवसही आपल्या आयुष्यात स्वतःची अशी एक वेगळी जागा बनवून जातात हे मात्र मला आता पटू लागले.
अनेक गप्पा गोष्टी मजा मस्करी थट्टा नवीन मित्र बनवल्यानंतर आता मात्र मी आणि माझा मित्र एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घराकडे आनंदाने वाटचाल करू लागलो. तर असा होता माझा अविस्मरणीय महाविद्यायालयातील पहिला दिवस.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.